व्‍यापारी म्‍हणून आलेल्‍या ब्रिटिशांनी 31 डिसेंबर,1600 साली भारतात  ईस्‍ट इंडिया कंपनीची स्‍थापना केली. यातूनच पुढे त्‍यांचे साम्राज्‍यावादी धोरण निर्माण झाले. व्‍यापारी म्‍हणून आलेल्‍या इंग्रजांना भारताता आपले साम्राज्‍य प्रस्‍थापित करण्‍यासाठी अनेक धुर्त कारवाया करणे सुरु केले. भारतीय सामाजिक व राजकीय परिस्थितीचा त्‍यांनी खुप चांगला अभ्‍यास केला. भारतातील राजकीय परिस्थिती, अंतर्गत कलह, भारतीय राज्‍यकर्त्‍यांचा एकमेकांबद्दचा व्‍देष, वैर या सर्व गोष्‍टींचा फायदा घेत ब्रिटिशंनी आपले मुळे रुजववण्‍यास सुरवात केली. त्‍यांचा या सर्व घडामोडी आपण येथे महत्‍वाच्‍या मुद्दयांच्‍या रुपाने पाहणार आहोत. 

              भारतात आपली सत्‍ता प्रस्‍थापित करताना इंग्रजांना पोर्तुगीज, फ्रेंच व डच यांच्‍याशी सत्‍ता  संघर्ष करावा लागला.